आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?
जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. धरणाचे बांधकाम हे 1965 साली सुरू झाले होते व ते 1976 मध्ये पूर्ण झाले. या धरणांमुळे जवळपास 35000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. धरणाची सर्वोच्च उंची 41.3 मी. आहे व लांबी 9997.67 मी. आहे. जायकवाडी धरणाला नाथसागर नावानेही ओळखले जाते. नाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही धरणाचा नावलौकिक आहे. शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या धरणाचा जन्म झाला. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. मराठवाड्याची तहान भागवणे, शेती फुलवणे, उद्योग धंदे वाढावे या उद्देशाने या धरणाची स्थापना करण्यात आली होती. धरणाची 102 ट